श्री अरुण एखंडे , ब्रिजमोहन पाटील , इन्स्पे . केडगे साहेब , डीसीपी साकोरे साहेब, मुख्यमंत्र्यांचे बॉडीगार्ड येवले साहेब , सीबीआय चे मोरे साहेब , सांगलीचे मा . प्रतीक पाटील यांचे बंधू मकरंद पाटील इत्यादी माणसांच्या साहाय्याने शेवटी माझा हरवलेला फोन मिळाला . तो आणून दिला एलसीबी चे संदीप गुरव साहेब यांनी . त्यांचे मनापासून आभार !
मी तब्बल ५ महिने ह्या फोनसाठी खूप फिरलो . खूप लोक मला म्हणाले की ' दुसरा फोन घेऊन देतो सर त्या फोनचा नाद सोडा ! ' पण फोनचा शोध माझ्यासाठी वेगळ्या अर्थाने मला अनुभवाच्या दृष्टीने समृद्ध करणारा होता . शिवाय हा फोन दिलेल्या समाजसेवी माणसाच्या प्रेमाचा हा विषय होता .
फोन आणण्यासाठी दोनदा सांगलीत गेलो . इम्रान पुणेकर ह्या मित्राची तिथे खूपच मदत झाली . अधोरेखित करण्याची बाब म्हणजे फोन मिळाल्यावर मी एकदम आनंदित झालोच नाही . का कुणास ठाऊक . ' माझी सान्तियागोगिरी ' नावाच्या ब्लॉगमध्ये मी फोनच्या शोधाने मला कसे कसे अनुभव आले ते मी लिहिले आहे . या फोनमधला डाटा मला मिळाला नाहीच . पण मी उदास नव्हतो . कारण मी अनुभवलेल्या ठिकाणांना आणि पाहिलेल्या माणसांना खूपच गडदपणे माझ्या डोळ्यांसमोर आत्तादेखील पाहू शकतो . मी जेव्हा डॉ . अनमोल कोठाडियांना म्हटले की , ते सगळे क्षण जे मी क्लिक केले होते ते माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे आत्ताही आहेत ... तेव्हा ते म्हणाले की , seeing and expierincing is important than clicking ! मलाही तसेच वाटते . आपण पाहिलेल्या कित्येक गोष्टी पाहताक्षणीच क्लिक करून जपून ठेवण्याच्या मागे लागतो . अनुभवण्याची क्षमताच जणू हरवलेय !
फोनमधल्या माहितीच्या गैरवापरही मला सतत चिंता लागून राहिलेली असायची; आजही आहे ! फोन नसण्याच्या कालखंडात खूपदा मनोरुग्णांचे , झाडांना ठोकलेल्या फलकाचे फोटो , जखमी गायीचे फोटो इ . गोष्टी सुटल्या . उपचार झाले पण अनेक व्यत्यय आले . घटनास्थळ किंवा इतर बाबींच्या अनुषंगाने फोटोंच्या नसण्याने किंवा सोबत इंटरनेट नसण्याचे खूपच तोटे झाले . पण काही वाईट नाही ; त्यामुळे पर्यायी मार्ग शोधणे आणि त्या दृष्टीने अजून वेगळ्या अंगांनी समस्येवर तोडगा येतो हेही कळले .
मूळ विषय आहे मिरज पोलिसांनी ( Miraj govt. railway police ) दाखवलेल्या अतिशय उदासीन दृष्टिकोनाचा ! २४ जानेवारी २०१६ ला तक्रार होती . तक्रार दाखल करून घेणाऱ्या राठोड नामक पोलिसाने दाखल करून घेतानाच ' गहाळ ' अशी दाखल करून घेतली ; यामुळे त्यांची जबाबदारीची टक्केवारी त्यांनी कमी करून घेतली ! दाखल करून घेतल्यानंतर त्यांनी मला तसा दाखला दिला . त्यानंतर मी केलेल्या कित्येक फोनांना उत्तर म्हणून त्यांनी ' अजून स्ट्रेस झालेला नाही तुमचा फोन , शोध सुरू आहे .... ! ' असे सततचे उत्तर पाठ करून माझ्या माथी मारले . मी दरेकर नावाच्या पोलिसांना सांगितले की , ' या फोनमध्ये कित्येक मनोरुग्णांचे फोटो आहेत , मनोरुग्णांनी विशेषतः स्त्री मनोरुग्णांनी सांगितलेल्या त्यांच्या विदारक आणि काही कच्च्या - पक्या जन्मकहान्या आहेत ..... ' माझ्या घालमेलीशी , तळमळीशी त्यांना जणू काहीच देणेघेणे नव्हते . दरेकरांशी सतत बोलून काहीच फायदा होत नसल्याचे मला निदर्शनास आल्यानंतर मी ब्रिजमोहन पाटील ( पुण्यातले पत्रकार ) यांच्या कानावर हा विषय घातला . त्यांनी पुण्याचे डीसीपी साकोरे साहेबांची भेट घालून दिली . त्यांच्या सल्ल्याने श्री अत्तारे साहेब यांनी या प्रकरणात मोलाची भूमिका केली . श्री अत्तारे साहेब यांनी तो फोन स्ट्रेस करून मला तशी माहिती दिली . एक फोन उत्तर प्रदेशात आणि दुसरा फोन असल्याचे त्यांनी सांगितले . तब्बल तीन महिन्यांनी ही बातमी माझ्या कानावर पडली होती . दरेकरांना हे सांगण्यासाठी मी फोन केला . तेव्हा त्यांनी दोन्ही फोन उत्तर प्रदेशात असल्याचे मला सांगितले ! सांगलीतल्या या फोनचा पाठलाग करणे मिरज ( Miraj govt. railway police )आणि विशेष करून दरेकरांना शक्य होते पण त्यांनी तत्परता दाखवली नाही . दरेकरांनी मला सतत ' साहेबांनी सांगितले तर मी जातो .... ' हे उत्तर दिले . साहेबांच्या आदेशाची ते वाट पाहत बसले .' सामान्य माणसाच्या फोनचा तपास ' अशा भूमिकेतून हा तपास व्हावा असे मला सुरुवातीपासून अपेक्षित होते ....! नाईलाजाने शेवटी मी आतापर्यन्त ज्या मानसिकतेतून हा सर्व तपास व्हावा असे मानत होतो तो विचार बदलला . सामान्य माणसांच्या तक्रारींबाबत पोलिसांची अशी भूमिका असणार आहे ; मी समाजसेवक किंवा आणखी कुणी का असेना !
शेवटी मिरज ( Miraj govt. railway police )पोलिसांनी दाखवलेय उदासीन दृष्टिकोनामुळे मी हा विषय माझ्या जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे बोललो . ( केडगे साहेब ) तेव्हाच हा विषय अरुण एखंडे साहेबांनी प्रतीक पाटील यांच्या बंधूंकरवी एलसीबी च्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातला आणि मग तत्परतेने त्यांनी तपास करून , शोध पाडून , त्या गावात जाऊन फोन आणला . आणि मला तसा त्यांनी फोन करून सांगितले . ' दुसराही फोन शोधून देतो काही काळजी करू नका सर ... तुम्ही खूप चांगले काम करत आहात , तुमच्या उपयोगी पडता आल्याचे कौतुक आहे ही त्यांची फोनवरचे प्रतिक्रिया मला महत्वाची वाटते .
खूपदा वाटले की हा विषय थोडा गंभीर करावा . त्या दोन्ही फोनमधली माहिती अतिशय महत्वाची होती . तिचा गैरवापर होणं माझ्यादृष्टीने खूपच वाईट / घातक होतं . पण मी विषयाला सैल सोडले . कारण पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली होती . फोन सापडलेल्या दिवशी मी माझी गाडी तडक मिरज ( Miraj govt. railway police ) कडे हाकली . तिथे भिंगारदेवे नावाचे पोलीस अधिकारी मला प्रत्यक्षच भेटले . साहेब गडबडीत होते . त्यांनी या विषयात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . .... पण खरं बोलायचं तर त्यांनी माझ्या तोंडाला पानेच पुसली होती . चोरी करणं जसा गुन्हा आहे तसाच चोरीचा माल विकत घेणे गुन्हाच नाही का ! मी हे एल . एल . बी.च्या वर्गात शिकूनसुद्धा साहेबांना सुलभ अशी काहीच प्रतिक्रिया दिली नाही . कुणीतरी नातेवाईक आजारी असल्याचे ते बोलत होते . बाकी वाईट ह्या गोष्टीचे वाटते की , त्यांनी मनात आणले असते तर संबंधित माणसाला आणून त्याच्याकडे चौकशी केली असती . त्याने काही तरी लीड दिली असती . त्याने काहीतरी माहिती नक्कीच दिली असती . पण ' बघतो , करतो ' ह्या त्यांच्या आश्वासनांनि मला खात्री दिली की आता हे काम ' रामभरोसेच ' असेल ! तरीही मी न चिडता बाहेर पडलो . पण मी या मतावर आजही ठाम आहे की पोलिसांनी मनात आणले तर ते कुठल्याही गुन्ह्याचा छडा लावू शकतात .
ह्या फोनच्या शोधाच्या निमित्ताने मला पोलिसांमधल्या ह्या दोन भूमिकांचे विश्लेषण करावे वाटले ; ते मी केले आहेच . सबंध शोधात माझ्यासारख्या प्रचंड ओळखीचा खजिना असणाऱ्या माणसाला जे अनुभव आले ते पाहता सामान्य माणसाच्या फिर्यादीचे काय हाल होत असतील याची आपण कल्पनाच केलेली बरी !
मी तब्बल ५ महिने ह्या फोनसाठी खूप फिरलो . खूप लोक मला म्हणाले की ' दुसरा फोन घेऊन देतो सर त्या फोनचा नाद सोडा ! ' पण फोनचा शोध माझ्यासाठी वेगळ्या अर्थाने मला अनुभवाच्या दृष्टीने समृद्ध करणारा होता . शिवाय हा फोन दिलेल्या समाजसेवी माणसाच्या प्रेमाचा हा विषय होता .
फोन आणण्यासाठी दोनदा सांगलीत गेलो . इम्रान पुणेकर ह्या मित्राची तिथे खूपच मदत झाली . अधोरेखित करण्याची बाब म्हणजे फोन मिळाल्यावर मी एकदम आनंदित झालोच नाही . का कुणास ठाऊक . ' माझी सान्तियागोगिरी ' नावाच्या ब्लॉगमध्ये मी फोनच्या शोधाने मला कसे कसे अनुभव आले ते मी लिहिले आहे . या फोनमधला डाटा मला मिळाला नाहीच . पण मी उदास नव्हतो . कारण मी अनुभवलेल्या ठिकाणांना आणि पाहिलेल्या माणसांना खूपच गडदपणे माझ्या डोळ्यांसमोर आत्तादेखील पाहू शकतो . मी जेव्हा डॉ . अनमोल कोठाडियांना म्हटले की , ते सगळे क्षण जे मी क्लिक केले होते ते माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे आत्ताही आहेत ... तेव्हा ते म्हणाले की , seeing and expierincing is important than clicking ! मलाही तसेच वाटते . आपण पाहिलेल्या कित्येक गोष्टी पाहताक्षणीच क्लिक करून जपून ठेवण्याच्या मागे लागतो . अनुभवण्याची क्षमताच जणू हरवलेय !
फोनमधल्या माहितीच्या गैरवापरही मला सतत चिंता लागून राहिलेली असायची; आजही आहे ! फोन नसण्याच्या कालखंडात खूपदा मनोरुग्णांचे , झाडांना ठोकलेल्या फलकाचे फोटो , जखमी गायीचे फोटो इ . गोष्टी सुटल्या . उपचार झाले पण अनेक व्यत्यय आले . घटनास्थळ किंवा इतर बाबींच्या अनुषंगाने फोटोंच्या नसण्याने किंवा सोबत इंटरनेट नसण्याचे खूपच तोटे झाले . पण काही वाईट नाही ; त्यामुळे पर्यायी मार्ग शोधणे आणि त्या दृष्टीने अजून वेगळ्या अंगांनी समस्येवर तोडगा येतो हेही कळले .
मूळ विषय आहे मिरज पोलिसांनी ( Miraj govt. railway police ) दाखवलेल्या अतिशय उदासीन दृष्टिकोनाचा ! २४ जानेवारी २०१६ ला तक्रार होती . तक्रार दाखल करून घेणाऱ्या राठोड नामक पोलिसाने दाखल करून घेतानाच ' गहाळ ' अशी दाखल करून घेतली ; यामुळे त्यांची जबाबदारीची टक्केवारी त्यांनी कमी करून घेतली ! दाखल करून घेतल्यानंतर त्यांनी मला तसा दाखला दिला . त्यानंतर मी केलेल्या कित्येक फोनांना उत्तर म्हणून त्यांनी ' अजून स्ट्रेस झालेला नाही तुमचा फोन , शोध सुरू आहे .... ! ' असे सततचे उत्तर पाठ करून माझ्या माथी मारले . मी दरेकर नावाच्या पोलिसांना सांगितले की , ' या फोनमध्ये कित्येक मनोरुग्णांचे फोटो आहेत , मनोरुग्णांनी विशेषतः स्त्री मनोरुग्णांनी सांगितलेल्या त्यांच्या विदारक आणि काही कच्च्या - पक्या जन्मकहान्या आहेत ..... ' माझ्या घालमेलीशी , तळमळीशी त्यांना जणू काहीच देणेघेणे नव्हते . दरेकरांशी सतत बोलून काहीच फायदा होत नसल्याचे मला निदर्शनास आल्यानंतर मी ब्रिजमोहन पाटील ( पुण्यातले पत्रकार ) यांच्या कानावर हा विषय घातला . त्यांनी पुण्याचे डीसीपी साकोरे साहेबांची भेट घालून दिली . त्यांच्या सल्ल्याने श्री अत्तारे साहेब यांनी या प्रकरणात मोलाची भूमिका केली . श्री अत्तारे साहेब यांनी तो फोन स्ट्रेस करून मला तशी माहिती दिली . एक फोन उत्तर प्रदेशात आणि दुसरा फोन असल्याचे त्यांनी सांगितले . तब्बल तीन महिन्यांनी ही बातमी माझ्या कानावर पडली होती . दरेकरांना हे सांगण्यासाठी मी फोन केला . तेव्हा त्यांनी दोन्ही फोन उत्तर प्रदेशात असल्याचे मला सांगितले ! सांगलीतल्या या फोनचा पाठलाग करणे मिरज ( Miraj govt. railway police )आणि विशेष करून दरेकरांना शक्य होते पण त्यांनी तत्परता दाखवली नाही . दरेकरांनी मला सतत ' साहेबांनी सांगितले तर मी जातो .... ' हे उत्तर दिले . साहेबांच्या आदेशाची ते वाट पाहत बसले .' सामान्य माणसाच्या फोनचा तपास ' अशा भूमिकेतून हा तपास व्हावा असे मला सुरुवातीपासून अपेक्षित होते ....! नाईलाजाने शेवटी मी आतापर्यन्त ज्या मानसिकतेतून हा सर्व तपास व्हावा असे मानत होतो तो विचार बदलला . सामान्य माणसांच्या तक्रारींबाबत पोलिसांची अशी भूमिका असणार आहे ; मी समाजसेवक किंवा आणखी कुणी का असेना !
शेवटी मिरज ( Miraj govt. railway police )पोलिसांनी दाखवलेय उदासीन दृष्टिकोनामुळे मी हा विषय माझ्या जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे बोललो . ( केडगे साहेब ) तेव्हाच हा विषय अरुण एखंडे साहेबांनी प्रतीक पाटील यांच्या बंधूंकरवी एलसीबी च्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातला आणि मग तत्परतेने त्यांनी तपास करून , शोध पाडून , त्या गावात जाऊन फोन आणला . आणि मला तसा त्यांनी फोन करून सांगितले . ' दुसराही फोन शोधून देतो काही काळजी करू नका सर ... तुम्ही खूप चांगले काम करत आहात , तुमच्या उपयोगी पडता आल्याचे कौतुक आहे ही त्यांची फोनवरचे प्रतिक्रिया मला महत्वाची वाटते .
खूपदा वाटले की हा विषय थोडा गंभीर करावा . त्या दोन्ही फोनमधली माहिती अतिशय महत्वाची होती . तिचा गैरवापर होणं माझ्यादृष्टीने खूपच वाईट / घातक होतं . पण मी विषयाला सैल सोडले . कारण पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली होती . फोन सापडलेल्या दिवशी मी माझी गाडी तडक मिरज ( Miraj govt. railway police ) कडे हाकली . तिथे भिंगारदेवे नावाचे पोलीस अधिकारी मला प्रत्यक्षच भेटले . साहेब गडबडीत होते . त्यांनी या विषयात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . .... पण खरं बोलायचं तर त्यांनी माझ्या तोंडाला पानेच पुसली होती . चोरी करणं जसा गुन्हा आहे तसाच चोरीचा माल विकत घेणे गुन्हाच नाही का ! मी हे एल . एल . बी.च्या वर्गात शिकूनसुद्धा साहेबांना सुलभ अशी काहीच प्रतिक्रिया दिली नाही . कुणीतरी नातेवाईक आजारी असल्याचे ते बोलत होते . बाकी वाईट ह्या गोष्टीचे वाटते की , त्यांनी मनात आणले असते तर संबंधित माणसाला आणून त्याच्याकडे चौकशी केली असती . त्याने काही तरी लीड दिली असती . त्याने काहीतरी माहिती नक्कीच दिली असती . पण ' बघतो , करतो ' ह्या त्यांच्या आश्वासनांनि मला खात्री दिली की आता हे काम ' रामभरोसेच ' असेल ! तरीही मी न चिडता बाहेर पडलो . पण मी या मतावर आजही ठाम आहे की पोलिसांनी मनात आणले तर ते कुठल्याही गुन्ह्याचा छडा लावू शकतात .
ह्या फोनच्या शोधाच्या निमित्ताने मला पोलिसांमधल्या ह्या दोन भूमिकांचे विश्लेषण करावे वाटले ; ते मी केले आहेच . सबंध शोधात माझ्यासारख्या प्रचंड ओळखीचा खजिना असणाऱ्या माणसाला जे अनुभव आले ते पाहता सामान्य माणसाच्या फिर्यादीचे काय हाल होत असतील याची आपण कल्पनाच केलेली बरी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा